लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेत आयुक्त संजय काटकर यांनी शुक्रवारी तब्बल २५३ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. यात सहायक आयुक्त, अभियांत्रिकी, लिपिक, शिक्षक ते शिपायांपर्यंत बदल्या करण्यात आल्या आहेत.

प्रामुख्याने या बदली आदेशात प्रभाग स्तरावरील कामकाजात सूसुत्रता यावी म्हणून पाच सहाय्यक आयुक्ताच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात काही दिवसापूर्वीच प्रभाग क्रमांक ६ च्या प्रभाग अधिकारी पदाची जबाबदारी सोपवलेल्या नरेंद्र चव्हाण कडून हा विभाग काढून घेत त्यांना पुन्हा अतिक्रमण विभागात हलवण्यात आले आहे. तर मध्यंतरी चर्चेत आलेल्या प्रभाग अधिकारी जितेंद्र कांबळे यांना प्रभाग ३ येथून प्रभाग क्रमांक १ येथे पाठवण्यात आले आहे. याशिवाय प्रियंका भोसले यांना प्रभाग क्रमांक ५ आणि कांचन गायकवाड यांना प्रभाग क्रमांक सहा ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच स्वच्छतेच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर १५१ सफाई कर्मचाऱ्यांच्या व २२ मजुरांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा-भाईंदर शहराला डेंगू-मलेरियाचा धोका; महिन्याभरात रुग्ण संख्या चारपट

अन्य बदल्या

सहाय्यक आयुक्त (५),
कार्यालयीन अधीक्षक (३),
वरिष्ठ लिपिक (५) ,
बालवाडी शिक्षिका (१४),
कनिष्ठ अभियंता (ठेका) (९) ,
शिपाई (४०),
सफाई कामगार (१५१),
रखवालदार (७)
मजूर (२२)

भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेत आयुक्त संजय काटकर यांनी शुक्रवारी तब्बल २५३ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. यात सहायक आयुक्त, अभियांत्रिकी, लिपिक, शिक्षक ते शिपायांपर्यंत बदल्या करण्यात आल्या आहेत.

प्रामुख्याने या बदली आदेशात प्रभाग स्तरावरील कामकाजात सूसुत्रता यावी म्हणून पाच सहाय्यक आयुक्ताच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात काही दिवसापूर्वीच प्रभाग क्रमांक ६ च्या प्रभाग अधिकारी पदाची जबाबदारी सोपवलेल्या नरेंद्र चव्हाण कडून हा विभाग काढून घेत त्यांना पुन्हा अतिक्रमण विभागात हलवण्यात आले आहे. तर मध्यंतरी चर्चेत आलेल्या प्रभाग अधिकारी जितेंद्र कांबळे यांना प्रभाग ३ येथून प्रभाग क्रमांक १ येथे पाठवण्यात आले आहे. याशिवाय प्रियंका भोसले यांना प्रभाग क्रमांक ५ आणि कांचन गायकवाड यांना प्रभाग क्रमांक सहा ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच स्वच्छतेच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर १५१ सफाई कर्मचाऱ्यांच्या व २२ मजुरांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा-भाईंदर शहराला डेंगू-मलेरियाचा धोका; महिन्याभरात रुग्ण संख्या चारपट

अन्य बदल्या

सहाय्यक आयुक्त (५),
कार्यालयीन अधीक्षक (३),
वरिष्ठ लिपिक (५) ,
बालवाडी शिक्षिका (१४),
कनिष्ठ अभियंता (ठेका) (९) ,
शिपाई (४०),
सफाई कामगार (१५१),
रखवालदार (७)
मजूर (२२)