लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : मिरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. यातील चौघांची बढतीने महाराष्ट्र सायबर विभागात बदली करण्यात आली आहे.

पदोन्नतीच्या कोटयातील पोलीस निरीक्षकांची रिक्त पदे २५ एप्रिल २००४ ज्या स्थितीनुसार सेवाज्येष्ठतेने भरण्यात येतात. २०२०४ नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना त्यांच्या मूळ सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस निरिक्षक पदावर बढती देण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार विभागीय पदोन्नती समितीने अशी बढती देण्यासाठी मागील वर्षी पात्रता तपासून निवडसूची तयार करण्यात आली होती.

आणखी वाचा-वसई : तलाठ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग, वसईत संतापाची लाट

या संदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये याचिका दाखल होत्या. अखेर सरळसेवा भरती नियम आणि याचिकांच्या निर्णयानुसार मार्च महिन्यात समक्रमांकीत आदेश पारित करण्यात आले होते. त्यानुसरा मंगळवारी पोलीस आस्थापना मंडळाने महाराष्ट्र पोलीस अधिनिमय १९५१ मधील कलम २२ नुसार राज्यातील ४४९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या पोलीस निरीक्षकपदी बढती देऊन बदली केली आहे.

या बढत्यांमध्ये मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ५ सहाय्यक पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे. त्याना पोलीस निरीक्षक पदावर बढती देऊन बदली करण्यात आली आहे. आयुक्तालयातील कैलास टोकले (सायबर), शशिकांत अवघडे (सायबर) योगेश देशमुख (सायबर) रणजितसिंग परदेशी (सायबर) प्रवीण बनगोसावी तर नितिन फळफळे (राज्य गुन्हे वार्ता) विभागात बदली करण्यात आली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Promotion of 5 policemen in police commissionerate mrj