लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : पावसाळा सुरू होताच यंदाही महामार्गावर समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. वसई पूर्वेच्या ससूनवघर- मालजीपाडा जवळ नाले टाकण्याचे काम सुरू आहे. याच दरम्यान रविवारी सकाळी पावसाळा सुरवात होताच रस्ता खचला आहे. रस्ता खचल्याने अवजड वाहने यात अडकून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Accident shocking Viral Video Multiple vehicle pile-up on UP highway due to thick fog, over 6 injured
VIDEO: बापरे! हायवेवर २५ पेक्षा जास्त वाहनं एकमेकांवर धडकली; चक्काचूर झालेल्या कार, आरडाओरडा अन् थरारक अपघात
Rickshaw driver stopped for drink tea and died in accident on sion panvel highway
चहाची तल्लफ काळ ठरली…! चहा पिण्यासाठी थांबले आणि अपघातात मृत्युमुखी पडले; शीव पनवेल महामार्गावरील घटना
Container Truck Collides With Multiple Vehicles near the khambatki tunnel
खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकरसह तीन मोटारींचा अपघात; जिवीतहानी टळली, मोटारीचे मोठे नुकसान
uncontrolled trailer damaged many cars Ambernath driver arrested
Video : बेदरकार ट्रेलरने अंबरनाथमध्ये अनेक गाड्यांना उडवले, ५० हून अधिक गाड्यांचे नुकसान; पोलिस, रिक्षाचालकांनी चालकाला पकडले
Traffic jam on the old Pune to Mumbai highway Pune news
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी
Fatal accident on Shilphata road thane accident news
शिळफाटा मार्गावर भीषण अपघात; रिक्षा चालक गंभीर जखमी

वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सद्यस्थितीत काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्राधिकरणाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका प्रवाशांना बसू लागला आहे. पावसाळा सुरू होण्या आधी उपाययोजना करा अशा सूचना प्राधिकरणाला केल्या होत्या. मात्र त्यानंतर ही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पाऊस सुरू होताच एकापाठोपाठ एक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.

आणखी वाचा-वसई: दहा मिनिटांच्या पावसात राष्ट्रीय महामार्गाची अवस्था बिकट, वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; वाहतूक पोलिसांकडून खड्डे भरण्याचे काम

रविवारी सकाळी पाच वाजता  ससूनवघर व मालजीपाडा या दरम्यान नाल्यातील पाईप टाकण्याचे काम सुरू असताना खोदकाम केलेला रस्ता खचून गेला आहे. रस्ता खचल्याने यात अवजड वाहनांच्या गाड्यांची चाकं त्यात अडकली. त्यामुळे नायगाव व भाईंदर या दरम्यान वाहतूक सेवा ठप्प होऊन वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

अडकलेली वाहने क्रेन मदतीने काढून त्यात खचलेल्या रस्त्याची तात्पुरता दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम प्राधिकरण व वाहतूक पोलीस यांच्या मार्फत सुरू आहे. सलग पावसाळा सुरवात होताच दुसरा दिवस ही कोंडीचा गेल्याने नागरिकांनी गलथान कारभारा विषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा-दुबईत नोकरीच्या आमिषाने तरूणीची फसवणूक;भरोसा कक्षाने केली सुखरूप सुटका

तीन तास कोंडीत

रस्ता खचल्याच्या समस्येमुळे गुजरात वाहिनीवरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. जवळपास तीन ते चार तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असल्याचे प्रवाशांनी सांगितले. सातत्याने अशा समस्या येत आहेत त्यासाठी प्राधिकरण व सरकार यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचा आरोप ही नागरिकांनी केला आहे.

Story img Loader