कल्पेश भोईर

वसई : वसई विरार शहराला जोडणाऱ्या महामार्गावर विविध प्रकारच्या अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषत: अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी या घटनांचे प्रमाण अधिक असून मागील तीन वर्षांत महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात २४९ अपघाताच्या घटना घडल्या असून यात १४८ प्राणांतिक अपघात तर १०१ गंभीर अपघात घडले आहे.

Traffic jam due to repair work on flyover on Mumbai Agra highway nashik news
उड्डाणपुलावरील दुरुस्ती कामामुळे गोंधळ; पूर्वकल्पना नसल्याने वाहनधारकांची गैरसोय, वाहतूक कोंडीत भर
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
heavy vehicles ban on mangaon to dighi highway order by raigad collector
अलिबाग: माणगाव ते दिघी महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिसुचना जारी
There has increase in number of potholes in Dronagiri node of Uran during monsoon
द्रोणागिरी परिसर खड्ड्यांत; पाऊस थांबल्याने मार्गावरील धुळीच्या उधळणीने प्रवासी आणि नागरिक त्रस्त
Protest of students, traffic jam, chinchoti road,
वसई : वाहतूक कोंडीपासून त्रस्त विद्यार्थी व भूमिपुत्रांचे आंदोलन, महामार्ग व चिंचोटी रस्त्याच्या समस्येबाबत संताप
palghar highway potholes marathi news
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महामार्ग खड्डेमय, दोन दिवस झालेल्या पावसात बुजवलेले खड्डे उख़डले, खड्ड्यांमुळे होणाऱ्या कोंडीने रस्ते प्रवास नकोसा
Entry of wild elephants into Gadchiroli border Gadchiroli
रानटी हत्तींचा गडचिरोलीच्या सीमेत प्रवेश, शहरापासून चार किमी अंतरावर वाहतूक रोखली..
Wardha dead bodies reservoir, Wardha,
वर्धा : जलाशयात आढळले तीन मृतदेह, दोघांची ओळख पटली; पूरबळी संख्या सात

नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहने चालविणे, चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटणे अशा विविध कारणांमुळे रस्ते अपघाताचे प्रमाण हे वाढू लागले आहे. वसई विरार भागातून गेलेल्या महामार्गावर तसेच तो शहराला जोडणाऱ्या विविध ठिकाणच्या मार्गावर रस्ते अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामध्ये अनेक मृत्यूसुद्धा झालेले आहेत. वाहतूक पोलिसांनी आता अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि वाहनचालकांनी सावधानता बाळगून वाहने चालवावी यासाठी पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. महामार्गावरील अशा सर्व ठिकाणांची पाहणी सुरू आहे. याच दरम्यान वसईच्या शहराला जोडणाऱ्या महामार्गावरील ११ ठिकाणच्या अपघात प्रवण क्षेत्रात २४९ इतके अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघात प्रवण क्षेत्रात किनारा ढाबा, (बसोंवा ते गुरूकृपा काठीयावाडी हॉटेल), दुर्गा माता मंदिर (गुरुकृपा काठीयावाडी हॉटेल ते दुर्गामाता मंदिर), हॉटेल रॉयल गार्डन ससूनवघर, एच.पी. पेट्रोलपंप मालजीपाडा, वासमाऱ्या पूल (लोढा धाम) बापाने पूल, हॉटेल साधना चिंचोटी पूल, बर्मा सेल पेट्रोलपंप तुंगारेश्वर फाटा, हॉटेल गोल्डन चॅरिअट, सायली पेट्रोलपंप, वसई फाटा, वंगणपाडा आदींच्या परिसराचा समावेश आहे. सर्वाधिक ४७ अपघात हे चिंचोटी येथील हॉटेल साधनाजवळील अपघात प्रवण क्षेत्रात घडले आहेत.

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग अथवा जिल्ह्यातील इतर मुख्य रस्त्यांवर सुमारे मागील तीन वर्षांत घडलेल्या अपघातांचे प्रमाण पाहता वाहतूक पोलिसांकडून अशा अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी करण्यात येऊन त्यांना ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित करण्यात येणार आहे. 

रस्ते अपघात ही सध्याची एक मोठी समस्या आहे. वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. अपघातप्रवण क्षेत्रे तसेच धोकादायक वळणांवर विशेष काळजी घ्यावी. – दादाराम करंडे, वाहतूक पोलीस निरीक्षक वसई विरार