सुहास बिऱ्हाडे

वसई : वसईची ओळख असलेला हरित पट्टा झपाटय़ाने कमी होत असून वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ‘आयआयटी मुंबई’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये हा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा अहवाल धोक्याची सूचना देणारा असल्याचे सांगून पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
article about sahyadri sankalp society information
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा ‘संकल्प’
Sakkardara lake, Nagpur, unsafe,
नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?
Golden Jackal
Golden Jackal : विक्रोळीत लांडग्यांची दहशत? वनअधिकारी म्हणतात, “तो लांडगा नव्हे तर…”
Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
mhada Reduce Consent Requirement of building owner for Group Redevelopment
समूह पुनर्विकासात इमारत मालकांच्या १०० टक्के संमतीला म्हाडाकडून आक्षेप, साडेआठशे इमारतींचा पुनर्विकास दृष्टिपथात!

‘आयआयटी’च्या पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाने वसई -विरार शहरातील सद्य:स्थिती दर्शविणारा पर्यावरण अहवाल प्रसिद्ध केला आहे. शहरात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू झाल्यानंतर ४.८ वाढीव चटई क्षेत्र (एफएसआय) आणि १.४० विकास हस्तांतरण शुल्क (टीडीआर) लागू झाले. त्यामुळे झपाटय़ाने बांधकामे होऊ लागली आहेत, असे या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे.

हेही वाचा >>>वसईतील अनधिकृत इमारतींची संख्या ५५ वरून ११७ वर, आणखी ६२ इमारती आढळल्या

नैसर्गिक नाले बुजवले असून कांदळवने नष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रतील हरित पट्टा कमी होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. शहरातील कूपनलिका आणि विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. आम्ही गेल्या काही वर्षांपासून जी भीती व्यक्त करत होतो तेच आता या पर्यावरण अहवालातून उघड झाल्याचे पर्यावरणवादी कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नालासोपार्‍यात महिलेने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, अपघाताचा रचला होता बनाव

ध्वनिप्रदूषणात वाढ..

सर्वसाधारण आवाजाचा निर्देशांक हा ० ते ५० असा असणे आवश्यक असताना वसईत तो १७० पर्यंत आहे. शहरात रोज ९७५ टन कचरा तयार होतो. पण, अवघा ५० टक्के (५००-५५० टन) कचरा उचलला जातो. त्यावरही वर्गीकरण केले जात नाही. कचरा व्यवस्थापन नसल्याने गटारे, नदी, खाडी, समुद्र, जमीन, पाणी सर्व प्रदूषित होत आहे.