लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : मागील चार ते पाच दिवसापासून सुरू झालेली रोरो सेवा शनिवारी दुपारी वसईच्या जेट्टी जवळ धडकली व त्यानंतर जागीच अडकून पडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. वसई -भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान मंगळवार पासून प्रायोगिक तत्त्वावर रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे. सेवा सुरू होऊन पाच दिवस झाले आहेत. सकाळी पावणे सात ते सायंकाळी साडे सात या दरम्यान ही सेवा दिली जाते.

एसटी प्रवाशांचा खोळंबा; गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन, संपामुळे २५१ पैकी ५९ आगारांचे कामकाज ठप्प
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
ST traffic disrupted in Nashik section due to agitation plight of passengers
आंदोलनामुळे नाशिक विभागात एसटी वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल
Pomegranate exports Australia, Pomegranate,
देशातून ऑस्ट्रेलियाला प्रथमच डाळिंब निर्यात; जाणून घ्या, नेमकं काय घडलं, संधी काय?
PM Narendra Modi in palghar marathi news
वाढवण बंदराचे आज पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन, मोठ्या रोजगार संधी निर्माण करणारा प्रकल्प
Nagpur, Bombay High Court, MSRDC, Nagpur Bench of Bombay High Court, Samruddhi mahamarg, vehicle inspections, Transport Department, Public Interest Litigation,
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समृद्धी महामार्गावरून प्रवास, अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल….
Nashik, Citylink, State Transport, Maha Mela, mukhya mantri Mahila Sashaktikaran Abhiyan, Tapovan Maidan, Ladaki Bahin Yojana, bus shortage, passenger disruption,
लाडक्या बहिणींच्या वाहतुकीमुळे बसेसची कमतरता विद्यार्थी, प्रवाशांचे हाल
national flag, quality, railway employees,
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हाती निकृष्ट दर्जाचे राष्ट्रध्वज

शनिवारी नेहमी प्रमाणे या फेरीबोटीची सेवा सुरू होती. मात्र दुपारच्या सुमारास वसईच्या जेट्टीवर ही बोट लावत असताना अचानकपणे ही बोट जेट्टीला धडकली व त्याचा मोठा हादरा त्यात असलेल्या प्रवाशांना बसला.

आणखी वाचा-मराठा आरक्षणासाठी लग्नाचा मुहूर्त बाजूला ठेवून वऱ्हाडींसह रास्ता रोको आंदोलनात उतरले नवरा-नवरी

त्यातच समुद्राला आहोटी आली असल्याने ती बोट जागीच अडकून राहिली. जवळपास दोन ते तीन तासापासून बोटीला काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. समोरून दुसऱ्या बोटींना दोर बांधून बोट खेचून पुढे नेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी दोन वेळा दोर तुटला असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. या घडलेल्या घटनेमुळे काही काळ प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.