वसई : वर्ष संपले तरी वसई विरार महापालिकेच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. त्यामुळे या मुख्यालयातील कार्यालयातील साहित्य आता खराब होऊ लागले आहे. जुन्या मुख्यालयाचे नवीन इमारतीत लवकर स्थलांतरीत करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. वसई विरार महापालिकेची स्थापना २००९ साली झाली. त्यावेळी ४ नगरपरिषदा अस्तित्वात होत्या. महापालिकेच्या स्थापनेनंतर विरार नगर परिषदेच्या कार्यालयात पालिकेचे मुख्यालय तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आले होते. मात्र महापालिकेच्या स्थापनेला १४ वर्षे उलटून गेली तरी अद्यापही नवीन मुख्यालय मिळालेले नाही.

दरम्यान, विरार पश्चिमेच्या परिवहन भवनाचे रुपांतर मुख्यालयात करण्यात आले. या मुख्यालयातील पहिल्या दोन मजल्यावर परिवहन भवन तयार करण्यात आले आहे आहे तर ३ ते ७ मजल्यांमध्ये मुख्यालय तयार कऱण्यात आले आहे. मात्र काम पुर्ण होऊनही नवीन मुख्यालयात कामकाज सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे या कार्यालयातील फर्निचर आणि इतर साहित्य आता खराब होऊ लागले आहे. लवकरात लवकर नवीन मुख्यालयात स्थलांतरीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.

PM Narendra Modi Thane, grand pavilion Ghodbunder,
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी, घोडबंदर भागातील मैदानात भव्य मंडपाची उभारणी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Mulye High School-College, girls molested kolambe,
रत्नागिरी : कोळंबे येथील मुळ्ये हायस्कूल- महाविद्यालयातील तीन मुलींचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल
Nagpur Hit and Run, Ritika Malu arrested, Ritika Malu,
नागपूर हिट अ‍ॅण्ड रन : नाट्यमय घडामोडीनंतर अखेर रितिका मालूला अटक
Loksatta explained What is the new controversy with the announcement of tribal university in Nashik
विश्लेषण: नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाच्या घोषणेने नवा वाद काय?
asiatic society mumbai news
मुंबई: “२२० वर्ष जुनी एशियाटिक सोसायटी ताब्यात घ्या”, कर्मचाऱ्यांची मोदी सरकारकडे मागणी!
Minister of State for Labour, EY, CA girl EY,
‘ईवाय’मधील ‘सीए’ तरुणीच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय कामगार राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Priyanaka Bishnoi (33), a 2016 batch officer and a Bikaner native, had undergone an operation at a private hospital in Jodhpur two weeks ago.
Priyanka Bishnoi : शस्त्रक्रिया चुकल्याने ३३ वर्षीय सहाय्यक जिल्हाधिकारी महिलेचा मृत्यू, कुठे घडली ही घटना?

हेही वाचा : वसई, भाईंदर मधून दररोज होतात ६ जण बेपत्ता, शोधासाठी पोलिसांची उदासीनता

विद्यमान कार्यालयात अडचण

पालिकेचे सध्याचे मुख्यालय विरार नगरपरिषदेच्या इमारतीत सुरू आहे. मात्र ती जागा अपुरी आहे. परंतु या इमारतीमध्ये जागेची कमतरता असल्याने छोटे छोटे भाग करून विभाग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेतील महत्वाची कागदपत्रे, दप्तर ठेवण्यापासून ते पालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची यावेळी अडचण होत असते. तर काही वेळा नागरिकांना कामासाठी इकडून तिकडे फेऱ्या माराव्या लागत असतात. तर पावसाळ्यात सुध्दा छतावरून पाणी गळत असल्याने आणखीनच अडचणी वाढत असतात.

हेही वाचा : वसईकरांना सुर्याच्या योजनेतील अतिरिक्त ९० दशलक्ष लिटर्स पाणी; नवीन नळजोडण्यांची मात्र अद्याप प्रतीक्षा

मुख्यालयाची मुळ जागा इतिहासजमा

पालिकेचे मुळ मख्यालय विरार पश्चिमेच्या बोळींज येथे बांधण्याचे ठरविण्यात आले होते. २०१७ मध्ये पालिकेने विरार पश्चिमेच्या विराट नगर येथे दहा एकर प्रशस्त जागेत सहा लाख चौरस मीटर क्षेत्रफळ एवढी जागा देखील निश्चित करण्यात आली होती. तत्कालीन पालकमंत्री विष्णू सावरा, खासदार चिंतामण वनगा यांच्या नव्या मुख्यालयाच्या कामाचे २०१७ साली इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते या मुख्यालयाच्या जागेचे भूमीपूजन करण्यात आले होते. या मुख्यालयाचा खर्च ३०० कोटी रुपये इतका होता. या प्रस्तावित मुख्यालय इमारतीत नाट्यगृह आर्ट गॅलरी, वस्तू संग्रहालय, लग्नकार्यासाठी सभागृह, कॉन्फरन्स हॉल आदींचा समावेश होता. पंचतारांकित हॉटेल्स प्रमाणे त्याची रचना करण्यात आली होती आणि तीन वर्षात पूर्ण केले जाणार होते. पालिकेच्या २०१८ च्या दैनंदिनीत या नवीन मुख्यालयाचे संकल्पचित्र प्रसिध्द करण्यात आले होते. मात्र आता मुख्यालयाची ही मुळ जागा इतिहास जमा झाली आहे.