‘मार्ग’ किंवा ‘रस्ता’ हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे. खरं नाही वाटत? दिवस उजाडला की दूध, पाव वगरे आणण्यासाठी आपल्याला आपल्या घराचा उंबरठा ओलांडावा लागतो आणि तिथूनच मग दिवसभरात आपला अनेक रस्त्यांशी संबंध येतो. हे रस्ते आपल्या सोसायटीतले असतील, कॉम्प्लेक्समधले असतील किंवा नगरपालिका, महानगरपालिका अथवा राज्य किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीतले असतील. पण रस्ता टाळून आपण आपला दिवस घालवायचा म्हटलं, तर केवळ घरात बसून राहिलं, तरच ते शक्य आहे. परंतु माणूस हा समाजप्रिय असतो. त्यामुळेच केवळ पोटापाण्यासाठी बाहेर पडणारेच रस्त्याचा वापर करतात, असं नाही, तर नुकतेच पाय फुटलेल्या लहानग्यालासुद्धा दिवसभरात केव्हा ना केव्हा मोठय़ांचा हात धरून किंवा सोडून दुडूदुडू चालत रस्त्यावर फेरफटका मारायचा असतो. तसंच निवृत्त झालेल्या ज्येष्ठांनाही फेरफटका मारून आपल्या पायांना व्यायाम देत ते िहडतेफिरते ठेवण्यासाठी याच रस्त्याची गरज असते. जीवनाच्या अखेरीस माणसाची शेवटची यात्रा निघते तीही याच रस्त्यावरून! त्यामुळे रस्ता हा माणसाच्या संपूर्ण आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे आणि म्हणूनच रस्ते बांधत असताना या पायाभूत सुविधेच्या दर्जाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तितकाच गंभीर असायला हवा. इमारतीच्या बांधकामाचा दर्जा खराब असला, आणि जर ती कोसळली, तर त्यातल्या माणसांच्या जिवाला धोका असतो. तसा तो रस्त्याच्या कामात नसतो, असं मानण्याचं कारण नाही. रस्त्यांवरच्या खड्डय़ांमुळे अपघात होऊन कितीतरी जणांनी जीव गमावल्याची आकडेवारी अनेकदा प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे इमारत कोसळल्यावर अनेकांचे जीव घेणारं सदोष बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला आणि संबंधित इंजिनीअरला जसं आणि जितकं दोषी धरलं जातं. तितकंच सदोष रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदाराला आणि संबंधित इंजिनीअरलाही दोषी धरलं पाहिजे. त्याकरता अपघात होईपर्यंत थांबण्याची गरज नाही. रस्त्यांवर खड्डे पडलेले दिसले की, लगेच कारवाई केली गेली पाहिजे. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडणाऱ्या या पावसाळ्यातल्या आजाराची साथ लवकरच ठिकठिकाणी पसरलेली दिसून येईल. पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईची पाहणी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा