खेड्यांमधून शहरांमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांवर खूप मोठा ताण येत आहे. शहरीकरण म्हणजे केवळ ग्रामीण भागातील रहिवाशांचे शहरांत होणारे स्थलांतर नव्हे; तर त्याचा परिणाम सामाजिक, आर्थिक व पायाभूत सुविधांमधील बदलांवर होतो.
गेल्या काही दशकांमध्ये शहरीकरणाच्या वेगाशी जुळवून घेणे सर्वांनाच कठीण होत आहे. जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या आता शहरी भागांत राहते. ही आकडेवारी २०१४ सालच्या संयुक्त राष्ट्र अहवालात नमूद करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या शहरी भागांची जगाच्या नकाशावरील व्याप्ती १ टक्क्याहूनही कमी आहे. यातून शहरी भागातील लोकसंख्येची घनता किती अधिक आहे याचा अंदाज येऊ शकतो. शहरांच्या वाढीबाबत जागरूकता वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ३१ ऑक्टोबर २०१४ पासून ‘वर्ल्ड सिटीज् डे’ला सुरुवात केली आहे.