घरात लहानमोठे वाद होतात तेव्हा मोठं माणूस मध्यस्थी करतं. एखाद्या वेळी घरातला सदस्य निराशेतून किंवा उद्वेगानं काही बोलू पाहतो तेव्हा इतरेजन त्याला चूप करतात. या आणि अशा प्रसंगी एक वाक्य हमखास वापरलं जातं. ते म्हणजे ‘वास्तू तथास्तु म्हणते..’
तिन्हीसांजेच्या कातरवेळी देवापुढे दिवा लावताना आजीला, आईला, गृहिणीला देवाची आणि वास्तूची प्रार्थना करताना, घरातल्या सर्वाचं शुभ चिंतताना अनेकांनी ऐकलं असेल.
‘संसारी या आनंदाची नित्य नवी बरसात
उतरला स्वर्ग इथे साक्षात’
अशा भावनेतून ती वास्तूला म्हणते-
 ‘धरी घरावर चंदन छाया
फुले पसरती सुगंधमाया
सांज लाविते मांगल्याची सदनी या फुलवात’
दुर्धर रोगानं आजारी माणूस वैद्यकीय तपासण्या करायला बाहेर पडताना आतूनबाहेरून खचलेला असतो. दवाखान्यात निघताना देवघरात जाऊन नमस्कार करतो, तेव्हा घरातील इतर सदस्य ‘नॉर्मल येतील हो सगळे रिपोर्ट्स, मी अमक्या देवाला साकडं घातलंय, त्यानं माझा शब्द आजवर खाली पडू दिला नाही.’ अशा शब्दांत त्याला धीर देतात. घराच्या चार भिंतींत अप्रिय अंदाज कोणी व्यक्त करीत नाहीत, कटू बातम्या स्पष्ट शब्दांत सांगणं टाळतात.
वास्तू नावाची कोणी देवता खरंच अस्तित्वात असते का? आपलं बोलणं ती ऐकत असते का? सगळी माणसं तिला का इतकी भिऊन असतात? तिची मर्जी राखली तर आपल्यावर अशुभाचं सावट पडणार नाही असा लोकांचा ठाम विश्वास असतो.
एका पापभिरू माणसाचा स्वत: पाहिलेला अनुभव सांगतो. अनेक वष्रे लक्ष्मी रोडवरच्या कचेरीत होता. सरासरी बुद्धिमत्ता आणि सरासरी कार्यक्षमता. रोज सकाळी वेळेवर यायचा. आत येताना इमारतीला वाकून नमस्कार करायचा. आल्यावर लगेच कामाला सुरुवात. संध्याकाळी गुपचूप लवकर कधीही पळून गेला नाही. जागेवरून उठताना आवर्जून दिवा मालवायचा. रजेवर असलेल्या व्यक्तीच्या जागेवरचा दिवा मालवायचा. ऑफीसची स्टेशनरी घरातल्या वस्तूंप्रमाणे जपायचा. दिवे मालवणं, स्टेशनरी वाचवणं यावरून तो ऑफीसमध्ये चेष्टेचा विषय झाला होता.
त्याच्या प्रमोशनची वेळ आली नि नेमका नवीन, खडूस बॉस आला. दोघांच्या स्वभावाच्या तारा काही जुळेनात. हा असा बावळट माणूस नको म्हणून बॉसनं त्याची बार्शीला बदली करायचा  घाट घातला. सगळीकडे पसरलं की प्रमोशन न होता हा बार्शीला जाणार. पण तो आपल्या श्रद्धेवर ठाम होता. ‘मी कोणाचं वाईट केलं नाही. या वास्तूत प्रामाणिकपणे राबलो. ही वास्तू साक्ष आहे. माझं वाईट होणार नाही.’ असं बोलायचा. प्रमोशनसाठी कोणाला भेटायला गेला नाही. शेवटी काय झालं कोण जाणे, प्रमोशनच्या यादीत त्याचं नाव आलं. त्याला जागेवरच प्रमोशन मिळालं. त्याच्या बॉसचीच नेमकी बार्शीला बदली झाली.  कोणतीही अतिशयोक्ती न करता हे लिहिलं आहे. वर्षांनुर्वष तो ज्या वास्तूवर प्रेम करीत होता, तिनं त्याला जवळ ठेवून घेतलं का? माहीत नाही. समजा, की हा योगायोग आहे.
पण ज्या कुटुंबावर वास्तू प्रसन्न असते तिथे सदैव गृहस्वामिनीच्या चेहऱ्यावर हास्य आणि जिभेवर प्रसन्न गाणं नक्कीच असतं.
 ‘आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली
हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी
सूर उधळीत आली भूपाळी’
तिच्या घरात आनंदाची वस्ती असते. आनंद शोधण्यासाठी तिला घराबाहेर पडायची किंवा आकाशाकडे पाहून देवाजीची करुणा भाकायची काय गरज असते. घरात हसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे, अशीच तिची भावना असते. वास्तू खूश असेल तर घरातली सारी माणसं खूश असतात.
‘घर हीच राजधानी नाही उणे कशाचे
संसार साजिरा हा साम्राज्य हे सुखाचे’
एका चौकोनी कुटुंबातल्या आई, वडील, थोरली ताई आणि धाकटा मुलगा- या चौघांचं एकमेकांवर अपार प्रेम होतं. मुलांकडून कितीही लहानमोठी चूक झाली तरी त्यांना रागवायचं नाही, मारायचं तर मुळीच नाही असा पालकांचा पण होता. पण थोरली मुलगी केव्हा तरी बालिश त्रास द्यायचीच. तिला धाक दाखवण्यासाठी आईवडील म्हणत, तू जर त्रास दिलास तर तुझ्या भावाला होस्टेलमध्ये ठेवू. मग तो तुला रोजरोज भेटणार नाही. या धमकीवर ती एकदम रडवेली व्हायची नि शरण यायची. हे सगळं त्या वास्तूनं खरंच ऐकून घेतलं का? पुढे बारावीनंतर त्या मुलाला खरोखरच पहिला, दुसरा, तिसरा- सारे प्रवेश परगावी मिळाले. लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. ती देखील दूर.
आता हे चौघे एकमेकांना फोनवर, आंतरजालावर, फेसबुकवर भेटतात. जिस तरह सुखे हुए फूल किताबों में मिले. केव्हा तरी एकाच गावात स्थायिक होऊ, असं दिवास्वप्न पाहतात. हादेखील योगायोग समजू.
कारण वास्तू नावाची कोणी देवता खरोखरच अस्तित्वात असेल तर ती काय आपल्या लेकरांना अशी शब्दांत पकडते का? तसं वाटत नाही. घर म्हणजे त्यातील सदस्यांच्या आपसातील प्रेमाचा आविष्कार असतो.
 ‘‘यहाँ महक वफाओं की मुहब्बत का रंग है
यह घर तुम्हारा ख्वाब है, यह घर मेरी उमंग है
न आरजू पे कैद है ना हौसले की जंग है
हमारे हौसले का घर, हमारी िहमतों का घर
यह तेरा घर, यह मेरा घर..’
‘ओम जय जगदीश’ या सिनेमामध्ये वास्तूत जीव गुंतलेल्या माणसांची कहाणी फार रोचकपणे सांगितली आहे. तीन मुलांची आई असलेली विधवा जुन्या घरात राहात असताना मोठा मुलगा ओम नोकरीनिमित्त परदेशी जातो. इकडं घरावर असलेलं कर्ज वेळेवर न फेडल्यामुळे घर सावकाराच्या ताब्यात जातं. पण यथावकाश ओम परत येतो, घर सोडवतो. भावंडं, आई आणि घर एकत्र आल्यावर होणारा आनंद व्यक्त करताना कवीला गेल्या शतकातल्या ‘Happy days are here again’ या गाजलेल्या गाण्याचे बोल आठवले आहेत.
 ‘चूडी सजी है हाथों में
फिर से बजी शहनाई है
मेहंदी रची है परों में
देखो खुशी घर आयी है

Happy days are here again
Happy days are here again’

Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Actor Vicky kaushal 25 kilos weight gain for Chhaava 80 to 105 kilos expert advice on weight gain
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटासाठी वाढवलं २५ किलो वजन, तुम्हालाही वजन वाढवायचं असेल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला ठेवा लक्षात
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Two people died in accident on Peth road nashik
नाशिक : पेठ रस्त्यावरील अपघातात दोन जणांचा मृत्यू
how to protect and lock your aadhaar card
तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? लॉक करण्यासाठी अन् गैरवापर टाळण्यासाठी काय करायचं? जाणून घ्या…
Man sets himself on fire
पत्नीनं घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यास दिला नकार, पतीनं उचललं धक्कादायक पाऊल

आईचा आशीर्वाद, देवाची कृपा आणि सर्व कुटुंब एकत्र येणं हीच त्यांना सुखाची परमावधी वाटते. शेवटच्या कडव्यात कवी तेच सांगू बघतो.
‘यह दुवा है मां की दुवा
ना कभी अब साथ यह छूटे
ना लगे इस घर को नजर
हमसे ना अब कभी रब रूठे’
आता ते एकमेकांना सोडून जाणार नाहीत. त्यांनी आईला वचन दिलं आहे की कायम खेळीमेळीनं एकत्र राहू-

‘वादा किया यह हमने साथ साथ है रहना

Happy days are here again
Happy days are here again’

‘वास्तू तथास्तु म्हणते’ यावर विश्वास ठेवला तरी ती कोणी आंधळी देवता नाही. तिच्यापाशी मूलभूत नतिकतेचा आग्रह आहे. ती फक्त चांगल्या गोष्टींना तथास्तू म्हणते. घराची उभारणी आणि उपभोगाला नतिक अधिष्ठान नसेल तर त्या घरात निभ्रेळ सुख लाभतच नाही. कधीकधी अजाणता घडलेली चूकदेखील आपलं सुख हिरावून नेते. दशरथानं राजवाडय़ाच्या वास्तूत आपल्याच राण्यांशी वागताना पक्षपात केला, तेव्हा तिथली वास्तू रुष्ट झाली असेल. रामासारखा मर्यादा पुरुषोत्तम पुत्र असूनही त्याला मरणसमयी आक्रोश करावा लागला..

‘दाटला चोहिकडे अंधार
देऊ न शकतो क्षीण देह हा प्राणांसि आधार

श्रीरामाच्या स्पर्शावाचून
अतृप्तच हे जळके जीवन

नाही दर्शन, नच संभाषण
मीच धाडीला वनात माझा त्राता राजकुमार’

आणि महाभारताची कथा पाहिली तर हेच दिसते. बलाढय़ कुरुकुलाच्या राजसभेत जेव्हा पांडवांना फसवले जाते, द्रौपदीच्या विटंबनेचा प्रसंग ओढवतो, तेव्हा द्रौपदी बजावते,

‘न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा:
न ते वृद्धा: ये न वदन्ति धर्मम्
नासौ धर्मो यत्र च नास्ति सत्यं
न तत्सत्यं यच्छलेनानुविद्धम्’

ज्या सभेत भीष्म, धृतराष्ट्रासारख्या वृद्धांना धर्माचं विस्मरण झालं, त्या कुरुकुलाच्या वास्तूला द्रौपदीचे तळतळाट पेलवले नाहीत. भर राजसभेत द्रौपदीच्या विटंबनेचा अघोरी, पण असफल प्रयत्न झाला. दु:शासन थकून लाजून बाजूला झाला. सभागृह अशुभ, अपशकुनी आवाजांनी भरून राहिले. विदुर कळवळून उठला व धृतराष्ट्राला म्हणाला, या दुष्कृत्यानं भयंकर उत्पात होत आहेत. मध्ये पड आणि कुळाला वाचव. तेव्हा धृतराष्ट्र घाबरला व त्यानं हस्तक्षेप केला, पण यथावकाश झालेल्या युद्धात सारं कुरुकुल नष्ट पावलं. स्वत: पांडवांनी खांडववन त्यातल्या माणसांप्राण्यांसह जाळून वसवलेली मयसभा आणि इंद्रप्रस्थाचं काय झालं? त्या नगरीचा क्रौर्यात जन्म झाला नि द्युतात अंत झाला. तक्षकानं अर्जुनाच्या नातवाला ठार केलं. त्या नगरीशी कोणताही राजवंश निगडित उरला नाही. हे सारं अंगावर काटा आणतं.
आज हे जुने दाखले, जुन्या संकल्पना कालबाहय़ वाटतील. पण नव्या जगण्याची गती भोवंड यावी इतकी वाढली आहे. तिला मनातून भ्यालेला माणूस विविध देव, बुवा, कर्मकांड यांच्या आहारी गेलेला दिसतो आहे. जीव मुठीत धरून कर्मकांड करीत जगण्याऐवजी आपलं घर, आपली वास्तू उभारताना, तिचा उपभोग घेताना, रोजचं आयुष्य जगताना आपल्या आतल्या आवाजाला विचारून रोजच्या व्यवहारातील नतिकता जमेल तितकी तपासून पाहायला काय हरकत आहे?

वास्तू नक्की तथास्तु म्हणत राहील.

Story img Loader