मात्र एका कोपऱ्यातलं एक बिऱ्हाड जागा सोडायला तयार नसावं. त्यांच्या दोन खोल्या शाबूत राहिल्या. नव्या नखरेल सिमेंटमधल्या वास्तूशी अनुरूप नसल्या तरी टिकून राहिल्या. नव्या उंच टॉवरसमोर त्या विरूप दिसत. पण हट्टाने उभ्याच होत्या.
जुनं सोडवत नाही. पण ते टिकवून कसं धरलं असेल त्या माणसांनी? आता त्या दोन खोल्यांच्या बिऱ्हाडामध्ये िभती आणि छप्पर सोडून जुनं काय उरलं असेल? आता खिडकीतून पूर्वीसारखा सूर्योदय दिसत नसेल. पूर्वी पश्चिमेहून येणारी आंब्याची सळसळ ऐकू येणे हरवले असेल. शेजारपाजार तर नव्या इमारतीत चौथ्या मजल्यावर गेला आहे. घराच्या पिछाडीला दुकानांची रांग आणि पाìकगचा तळ आणि अहोरात्रची वर्दळ आहे. आता कदाचित त्या भिंतींच्या आत फक्त भूतकाळाचा आभास असेल.
जुन्याचा मोह मलादेखील सुटत नाही. कुणालाच सुटत नाही. म्हणूनच तुमच्याआमच्या मनात आठवणींची अडगळ साठत जाते. रात्री-अपरात्री कुठे रेडिओवरून ‘दिल एक मंदिर’ मधले गाणे ऐकू येते.
‘याद न जाये बीते दिनों की,
जाकर न आये जो दिन
दिल क्यों बुलाये, उन्हें दिल क्यों बुलाये..’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा