चाळसंस्कृतीचा अध्याय संपला
‘वास्तुरंग’ (२९ ऑगस्ट) मध्ये ‘चाळींतील उत्सवांनी जगायला शिकविले’ हा लेख वाचला. सार्वजनिक-सांस्कृतिक जीवनाशी जोडणारी चाळ आज काळाच्या ओघात नष्ट होत आहे. ‘वसुधव कुटुंबकम्’ ही संकल्पना मुंबईतील अनेक चाळींनी नकळत जपली आणि जोपासली. चाळीत सर्व काही सार्वजनिक- अगदी सुखापासून दु:खापर्यंत. आमच्याकडे सकाळी ६ वाजता उघडलेले दरवाजे रात्री ११ वाजताच बंद व्हायचे. दरवाज्याप्रमाणे सर्वाच्या मनाचे कवडसेही २४ तास उघडेच असायचे. कोणाच्याही घरातच काय तर त्यांच्या वैयक्तिक बाबींमध्येही घुसण्याची परवानगी लागत नसे. कोणी कुठेही जा, कोणाच्याही घरी जाऊन हक्काने काहीही मागा, परकेपणा नव्हताच. चाळी संपल्या आणि एका संस्कृतीचा अध्यायही संपला.
– संजय शेलार.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा