पुण्यातून उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये स्थलांतरित मजुरांना घेऊन बुधवारी विशेष रेल्वे रवाना होणार आहे. चार वाजता या गाड्या पुणे स्थानकातून निघतील. पुण्यातील वाघोली येथून सुमारे तेराशे मजूर हे आपल्या घरी परतण्यासाठी रवाना होत आहेत.
पीएमपीच्या सुमारे ३५ बस या मजुरांना वाघोली तुन पुणे रेल्वे स्थानकात घेऊन निघाल्या. या मजुरांना त्यांच्या प्रवासात खाण्यापिण्याचं काही त्रास होऊ नये म्हणून पुरेसे साहित्य, पाण्याची बाटली असे एक कीट प्रत्येकी देण्यात आले.
प्रॉब्लेम सॉल्वर टीम, वाघोली ग्रामपंचायत, शिवसेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष माऊली आबा कटके, जिल्हा परिषद सदस्य, पीएमपीएमल प्रशासन, प्राऊड इंडियन केअरींग क्लब यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला. या किटमध्ये मजुरांना पुरी भाजी पॅकेट, बिस्किट, फळं, गुळ दाणे, वेफर्स, पाणी बॉटल असे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.