मनसेच्या त्यावेळी निवडणूक लढण्याचा फायदा आम्हाला झाला होता. त्यावेळी निवडणूक लढणं ही त्यांची राजकीय इच्छाशक्ती होती. परंतु आजची मनसेची राज्यातील परिस्थिती बिकट आहे, असं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. ‘लोकसत्ता‘तर्फे आयोजित ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा‘ या वेबसंवादात अशोक चव्हाण सहभागी झाले होते.