मालेगावात करोनामुळं झालेल्या मृत्यूंचे आकडे लपवले गेलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी सर्वाधिक रुग्णांसाठी मालेगाव देशात चर्चेत आलं होतं. मात्र, आता तिथं शून्य रुग्ण असून चांगल्या पद्धतीने तिथे हा विषय हाताळण्यात आलेला आहे. आकडे लपविण्याचा प्रश्नच येत नाही कारण कोणी जरी मृत्युमुखी पडलं, तरी स्मशानभूमीत त्याची नोंद असतेच ना. त्यामुळे फडणवीसाचा आरोप चुकीचा असून वास्तवतेला धरुन नाही.