कोल्हापूर येथील एका सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, असा पुनरुच्चार केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. फडणवीस पुन्हा आले तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांचं काय होणार या संदर्भात पत्रकाराने विचारला. त्यावर आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.