“अनेक ठिकाणी प्रकल्प होत असताना गैरसमजातून विरोध होतो. उद्योजक कुठल्या प्रकारचा उद्योग आणतोय याची माहिती घेणे गरजेचे आहे त्यामुळे गैरसमज दूर होतील. या उद्योगामुळे चांगल्या पद्धतीचा रोजगार आणि जमिनीला चांगला भाव मिळणार आहे हे जर जनतेला पटवून दिलं तर विरोध मावळतो. बारसु प्रकल्प सकारात्मक दृष्टीने शेतकऱ्यांना विचारून घेऊन पुढे नेण्यात येईल. इथून पुढेसुद्धा महाराष्ट्रात प्रकल्प आणायची योजना आहे, कोकणवासियांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे” अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.