भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी (१९ मे) मोठा निर्णय घेत २ हजार रुपयांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी या २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्यात, असे निर्देश दिले. यानंतर या निर्णयाची जोरदार चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारमधील केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली.