त्र्यंबकेश्वर मंदिर प्रश्नी १३ मे रोजी जी गोष्ट घडली त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर उरुस आयोजकांनी पुढच्या वर्षीपासून त्र्यंबकेश्वराला धूप न दाखवण्याचा निर्णय घेतला. या मंदिराच्या मुद्द्यावरून जे काही घडलं त्यावरुन राजकारण आणि आरोप-प्रत्यारोप झाले होते. याच बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. हा प्रश्न गावकऱ्यांनी सोडवायचा आहे इतरांनी त्यात लुडबूड करु नये असं त्यांनी म्हटलं आहे.