कल्याण पूर्व येथील लोकग्राम पुलाचा भूमिपूजन सोहळा शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण हे अनुपस्थित होते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये निर्माण झालेली दरी कमी होण्याचं नाव घेत नाही अशी चर्चा कार्यक्रमादरम्यान सुरू झाली. मात्र, शिवसेना भाजपा युतीत सगळे आलबेल आहे, आम्ही सगळे एकत्र आहोत. रवींद्र चव्हाण यांना वेगळे कार्यक्रम आहेत, इथे सगळ चांगल चालल आहे, युती वेगळ्या विचारांनी उद्देशाने झालेली आहे, ती छोट्या किरकोळ कारणामुळे तुटणार नाही, असं स्पष्टीकरण खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले.