शरद पवारांनी आमच्यासह डबलगेम केला त्यामुळेच आमचं सरकार येऊ शकलं नाही. सगळी चर्चा शरद पवारांशीच झाली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी घेतला होता. भल्या पहाटे हा शपथविधी घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. हा शपथविधी नेमका कसा घेतला? यामागे कुणाची खेळी होती? याबाबत लोकांच्या मनात अद्याप संभ्रम आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना सगळं ठाऊक होतं आणि त्यांनी डबल गेम केल्याचं म्हटलं आहे. याविषयी शरद पवारांना विचारलं असता मी डबलगेम केला असं ते म्हणत असतील तर ते यात का फसले? असा प्रतिसवाल केला आहे.