विरोधकांच्या आघाडीचं नुकतंच ‘इंडिया’ (INDIA) असं नामकरण करण्यात आलं आहे. त्यावर पंतप्रधान मोदींनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र राजस्थानमधील एका कार्यक्रमात मोदींनी यावर भाष्य करत काँग्रेससह विरोधकांच्या आघाडीवर टीकास्त्र डागलं आहे. या आधी देखील यांनी ‘इंदिरा इज इंडिया’चा नारा दिला होता. आता ते युपीए इज इंडिया असं म्हणत आहेत. जनता यांचे पुन्हा तेच हाल करेल जे आधी केले होते, अशी घणाघाती टीका मोदींनी केली आहे.