‘मेरी माटी-मेरा देश’ या अभियानांतर्गत शिलाफलकाचे अनावरण आणि ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तु जतनाच्या विविध कामांचे लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाचा आढावा सांगत असताना विरोधकांना टोलाही मारला, “रस्त्यांची कामं चालू आहेत, इतर कामं चालू आहेत. अर्थात, चांगली कामं चालू असताना काही लोकांच्या पोटात दुखतं. मग ते रोज एक पत्र लिहितात. असंच एक पत्र त्यांनी स्वत:ला २५ वर्षं लिहिलं असतं, तर कदाचित मुंबई अधिक चांगली झाली असती. मी चहल यांना एवढंच सांगेन, तुम्ही चांगलं काम करत आहात. एकच लक्षात ठेवा, निंदकाचे घर असावे शेजारी, तसं आपल्या शेजारी ते बसले आहेत”