शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे सोलापूर दौऱ्यावर असताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “दिल्लीच्या अदृश्य शक्तीने महाराष्ट्राचा खेळ खंडोबा करून ठेवलाय” अशी टीका सुळेंनी केली आहे. “राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री निवडत असताना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जावं लागतं हे सर्व अदृश्य शक्ती करत आहे” असा टोलाही सुळेंनी लगावला.