छगन भुजबळ जातीय तेढ निर्माण करण्याची भाषा करतात. घटनेच्या पदावर बसून तेढ निर्माण करण्याचं काम कलंकित नेता म्हणून भुजबळ करत आहेत. भुजबळ महाराष्ट्राला लागलेले कलंक आहेत, अशी टीका मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. बीडमधील दंगल भुजबळांनीच घडवून आणली, अशी शंकाही जरांगे-पाटलांनी उपस्थित केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.