काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभेत संधी देण्यात आली आहे. राज्यसभेत निवडून गेल्यानंतर अशोक चव्हाणांचं हे पहिलंच पावसाळी अधिवेशन आहे. या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी अत्यंत संयमाने विरोधकांना काव्यातून प्रत्युत्तर दिलं आहे. ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलत होते.