राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मंगळवारी (२ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यापालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत होते. त्यावेळी शालेय गणवेशाच्या गुणवत्तेचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी मांडताना रोहित पवार यांचं नाव घेतलं. यावेळी केलेल्या एका विधानावरून सभागृहात एकच हशा पिकला.