Ratan Tata Passed Away in Mumbai: भारतीय उद्योग विश्वाचे अध्वर्यू रतन टाटा यांचं बुधवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं आणि उद्योग विश्वावर शोककळा पसरली. रतन टाटा यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांसाठी ठरवलेलं ध्येय सांगणारं त्यांचं एक भाषण सध्या पाहायला मिळत आहे. एप्रिल 2022 मध्ये आसाममधील दिब्रुगड कर्करोग केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी रतन टाटा बोलत होते. रतन टाटा यांनी आरोग्याच्या महत्त्वावर आपले विचार व्यक्त करणारे अतिशय हृदयस्पर्शी भाषण केले.