भाजपाच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर हल्ला केला असून तोडफोड करण्यात आली. हा जमाव पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असताना त्यांनी जमावावर लाठीचार्ज केला. “आमचं कार्यालय वाचवण्याच्या प्रयत्नात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केला”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिली.