Devendra Fadnavis on Sahitya Sammelan : “आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न करत संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यानंतर दुसऱ्या उद्घाटन सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोचऱ्या शब्दात टीका केली. यावरून अनेकांनी प्रत्युत्तर दिलं. संमेलनात राजकीय शेरेबाजी झाल्याने नाराजी व्यक्त केली गेली. तसंच, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही याच व्यासपीठावर उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.