धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यमंत्रीमंडळातील आणखी एका नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाचा थेट उल्लेख करून त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. ते आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.