संवाद हे भाषेचे मुख्य काम आहेच. परंतु, ज्या भाषेतून प्रगती, विकास साधला त्यातून संवाद साधला तर तो जास्त विचारपूर्वक, परिणामकारक ठरतो. संवादापासून व्यवहारापर्यंत प्रत्येक पायरीवर याचा उपयोग होतो. या अर्थाने जगण्यातील मातृभाषेचे महत्त्व अनन्यसाधारण. ‘लोकसत्ता’तर्फे प्रकाशित ‘मराठीने घडवलेले’ या विशेष पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी या पुस्तकात सहभागी झालेल्या मान्यवरांच्या परिसंवादात हाच विचार प्रकट झाला.