Prakash Ambedkar: सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केल्याची माहिती, वंचित बहुजन आघाडीचे अध्यश्र अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. मात्र, या नंतर कारवाई कोण करणार याबाबत कायदा अपुरा आहे. कायदा अपुरा असल्याने तपासाबाबत कोर्टाने निर्देश द्यावेत, अशी आम्ही मागणी केली आहे. तसंच या प्रकरणात एसआयटी नेमावी आणि ही एसआयटी सरकारच्या नाही तर कोर्टाच्या देखरेखीखाली काम करेल, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.