Pahalgam Terrorists in Anantnag: पहलगाममध्य दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेला सात दिवस उलटले असून यादरम्यान भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता एकीकडे बोलून दाखवली जात असताना दुसरीकडे लष्कर, काश्मीर पोलीस, एनआयए यांची शोधपथकं हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी काश्मीर पिंजून काढत आहेत. याच पार्श्वभूमीवर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी लोकसत्ताने साधलेला संवाद.