हरयाणा आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार असल्याचे संकेत मतदानोत्तर चाचण्यांतून मिळत असले तरी आपला या चाचण्यांवर विश्वास नाही, असे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी येथे पत्रकारांना सांगितले. निवडणुकीनंतरच्या आघाडय़ांबाबत विचारता ते म्हणाले की, भारतीय राजकारणात आज तत्त्वनिष्ठ राजकारण पिछाडीला गेले आहे आणि नेत्यांचा वैयक्तिक करिष्मा अग्रस्थानी आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री- पंतप्रधान कोण होणार, याबाबत साठमाऱ्या सुरू असतात. राजकारणात तत्त्वनिष्ठेलाच महत्त्व असले पाहिजे व्यक्तिनिष्ठेला नव्हे, असेही त्यांनी नमूद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digvijay singh trashes exit poll predictions