‘ग्रीनपीस’ या संघटनेने अलीकडेच सादर केलेला हवा प्रदूषणाबाबतचा अहवाल भारतासाठी निराशाजनक आहे. याचे कारण म्हणजे जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांत भारतातील २२ शहरे आहेत. यातही जगातील राजधान्यांमध्ये दिल्लीचा पहिला क्रमांक आहे. चीनने प्रदूषणाची पातळी कमी करण्यात बरेचसे यश मिळवले असले तरी ज्या तीन हजार शहरांमध्ये प्रदूषणाचे हे मापन करण्यात आले आहे त्यात चीनचीही अनेक शहरे आहेत. फक्त ती वेगवेगळ्या क्रमांकांवर आहेत. दिल्लीप्रमाणेच बीजिंगमध्येही हवा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होता, पण त्यावर चीनने मात केली आहे असे यातून दिसते आहे. ‘ग्रीन पीस अँड एअर व्हिज्युअल अॅनॅलिसिस ऑफ पोल्यूशन’ अहवालात तीन हजार शहरांचा अभ्यास करण्यात आला, त्यात ६४ टक्के शहरांनी जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेली पीएम २.५ कणांची पातळी ओलांडल्याचे दिसत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा