कौस्तुभ दिवेगावकर, आयएएस
मराठवाड्याचा इतिहास आणि भूगोल यांचा मराठवाड्याची मानसिकता घडण्यात मोठा वाटा आहे. आजच्या संदर्भात मुक्तिसंग्रामाकडे कसे पहावे याबद्दल काही सूत्रे आधी मांडूया. मुक्तिसंग्राम हा निजामाच्या आणि त्याच्या जमीनदारांच्या सामंती सत्तेविरुद्ध होता. शेती, सिंचन, जमिनीवरील मालकी, इनाम जमिनी, कुळांचे प्रश्न, शिक्षणाचा अभाव, आधुनिकतेचा अभाव ही मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्यामागची कारणमीमांसा समजून घेतली पाहिजे. हा लढा निजामाचे स्वतंत्र भारताच्या मधोमध बाल्कन प्रदेशासारखे स्वतंत्र राज्य तयार करण्याचे प्रयत्न, त्यासाठी रझाकारांना दिलेली मोकळीक, यातून निर्माण झालेली हिंसा यासंदर्भात पाहणे स्वाभाविक आहे. पण रझाकार संघटनेत अल्पसंख्याक समाजातील दोन टक्केही लोक सामील नव्हते. या लढ्यावर धार्मिक मोजपट्टी लावताना निजामाचे राजकारण तपासले पाहिजे. आधुनिकता-लोकशाहीची आकांक्षा असणारी जनता विरुद्ध प्रतिगामी सामंतशाही या प्रतिमानांत हैदराबाद मुक्तिसंग्राम तपासला पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा