पावसाळा सुरू झाला की साखर कारखान्यांना ऊस गळीत हंगामाचे तर अनंत चतुर्दशी संपली की शेतकरी संघटनांना ऊस दर आंदोलनाचे वेध लागतात. यावर्षीही कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनांनी केवळ एफआरपी नव्हे तर त्याहून अधिक रक्कम दिली जावी, यासाठी स्वाभिमानी, जय शिवराय, आंदोलन अंकुश यांनी ऊस परिषदांचे आयोजन केले आहे. अशातच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील कारखाने एकरकमी एफआरपी देतील अशी घोषणा केली. सांपत्तिक स्थिती उत्तम असलेल्या कारखान्यांना याचे फारसे काही वाटले नाही. पण, अर्थकोंडी झालेल्या कारखानदारांच्या पोटात मात्र गोळा आला आहे. याची चर्चा सुरू असताना विधानसभेच्या कामाचा अनुभव असलेले एक अध्यक्ष म्हणाले, हंगाम सुरू झाला की सुरुवातीला महिनाभर एफआरपी द्यायची. पुढे थंडी पडली की आंदोलनही गारठते. मग पुढचे पुढे; जे होईल ते पाहूा,ह्ण असे विधान केले. आधी आक्रमक असलेले शेतकरी संघटनांचे आंदोलन पुढे कसे थंड होते, यावर हे मार्मिक भाष्य ठरले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा