राजकारणात कुठलाही विषय वज्र्य नसतो. उलट ज्याचा नागरिकांशी थेट संबंध येतो, त्यावरून रान उठवून सहानुभूती मिळवता येते. त्यामुळे पावसाळय़ात मुंबईतील खड्डय़ांचा गाजणारा मुद्दा सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडीला सत्तेतून अकस्मात पायउतार व्हावे लागल्याने माजी मंत्र्यांना आता महामार्गावरील खड्डय़ांनी खडतर झालेली वाट स्वच्छपणे दिसत आहे. नाशिक-मुंबई महामार्ग तर मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातून जातो. तेथील खड्डे, वाहतूक कोंडीला त्यांना जबाबदार धरता येते. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी खड्डय़ांमुळे मिळालेली संधी दवडली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या सर्वच खाती असून त्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे, असा टोला त्यांनी लगावला. मुंबईहून नाशिकला येताना भुजबळ ठाणे, भिवंडीतील वाहतूक कोंडीत अडकले होते. सामान्यजनांची वाहने कित्येक वर्षांपासून याच खड्डेमय मार्गावरून ये-जा करतात. कधीकाळी भुजबळ यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते होते. त्याच वेळी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने महामार्गाचे चौपदरीकरण मार्गी लावले होते. पण तो इतिहास झाला. वर्तमानात खड्डय़ांचे राजकारण महत्त्वाचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा