साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन ठेवले होते. या कार्यक्रमाला उदयनराजेंचा विरोध होता. शिवेंद्रसिंहराजे पोहोचण्यापूर्वीच उदयनराजे त्या ठिकाणी पोहोचले. अनेक दिवसांनंतर दोघे समोरासमोर आले. त्यांच्यात जोरदार वाद झाले. कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने जमले. त्यांच्यामध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. उदयनराजेंनी पोकलेन आणले आणि शिवेंद्रसिंहराजेंनी आणलेला कंटेनर साहित्य ढकलून दिले. उदयनराजे म्हणाले, जागा माझी आहे, माझ्या जागेत पाय ठेवू देणार नाही. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले जागा आमची आहे, त्यांनी इथून निघून जावे. दोघांनी पोलिसांना आपली बाजू सांगितली. पोलिसांनीही हस्तक्षेप करत सगळय़ांना पिटाळले. उदयनराजे म्हणाले, त्यांना आधी जायला सांगा, तर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले त्यांना आधी जायला सांगा. मग वादंग सुरू झाले. दोघे एकमेकांना नडले. मधोमध पोलीस. मग त्यांचे कार्यकर्तेसुद्धा न नमले आणि काय जादू काही मिनिटांत सगळेच निवळले. दोघांनी वेगवेगळे नारळ फोडले, टिकाव मारले भूमिपूजन दोघांनीही केले. सातारा पोलीसही मध्यस्थीत यशस्वी झाले. दोन राजे किती काळ भांडणार हा सातारकरांना पडलेला प्रश्न आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा