मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या वेशीवर रोखण्यात यश आल्याने महायुतीच्या नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरीच धडपड केली. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याची जरांगे यांची मागणी होती. पण सरकारने अधिसूचनेचा मसुदा काढून जरांगे यांचे समाधान केले. सुरुवातीला जरांगे वाशीच्या सभेत अध्यादेश असाच सारखा उल्लेख करीत होते. प्रत्यक्ष तो अधिसूचनेचा मसुदा होता. सरकारी यंत्रणा एखाद्याला कसे गंडविते हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावे म्हणून मुख्यमंंत्री शिंदे यांनी वाशी गाठली. मराठा समाजाच्या वतीने शिंदे यांच्यावर गुलाल उधळण्यात आला. हे सारे झाले पण मराठा समाजाच्या हाती नेमके काय लागले हे मात्र कोणीच स्पष्टपणे सांगू शकले नाही. राजकीय कौशल्य वापरून मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलन चिघळणार नाही, याची खबरदारी घेतली व त्यात ते यशस्वी झाले. गुलाल तर उधळला, पण पुढे काय…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा