दोन वर्षांपूर्वीच लोकसभेच्या आणि गेल्या वर्षी राज्यात झालेल्या निवडणुकांचा हँगओव्हर अजून उतरायचाच आहे. या काळात निवडणूक म्हणजे काय.. या प्रश्नाला महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या तरुणाईकडून मिळणारे उत्तर हे धिंगाणा.. अशाच स्वरूपाचे होते. निवडणुका म्हणजे राजकारण आणि राजकारण म्हणजे वाईट.. या मानसिकतेतून राजकीय पक्ष, संघटना यांच्यापासून गेल्या अनेक वर्षांत तरुण दुरावलेले दिसतात. लोकशाहीचा गाभा असणाऱ्या मतदानाच्या हक्काशीही फारकत घेणारी तरुणाई आता मतदानाकडे सकारात्मक नजरेने पाहू लागली असली, तरी राजकारणाशी फटकूनच आहे. .. तर अशा या तरुणाईला लोकशाहीचा पाया असलेल्या निवडणूक प्रक्रियेची तपशिलात माहिती व्हावी, निवडणुकांमधून नवे नेतृत्व निर्माण व्हावे आणि झालेच तर विद्यार्थी संघटनांही पुन्हा मजबूत व्हाव्यात, पक्षांनाही कार्यकर्ते मिळावेत, त्यातून भावी मतदारांपर्यंत पक्षांची विचारधारा रुजवण्याची संधी मिळावी अशा अनेकविध हेतूंनी राज्यात पुन्हा एकदा महाविद्यालयीन निवडणुकांचा विषय वाजत गाजत पुढे आला. नव्या विद्यापीठ कायद्याच्या प्रस्तावित मसुद्यातही महाविद्यालयीन निवडणुकांची तरतूद करण्यात आली आहे. कायदा अजून संमत झाला नसला, तरी लवकरच त्यासंबंधीचा अध्यादेश काढण्याची तयारीही शासनाही सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा