विवाहखर्च आणि हुंडा या दोन मोठय़ा समस्या आज आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या शेतकरी कुटुंबांसमोर आहेत. विवाह हा वास्तविक कौटुंबिक सोहळा. परंतु त्याचे स्वरूप आज पूर्णत: पालटले आहे. समाजातील पत जोखण्याचा तो कार्यक्रम झाला आहे. त्यापायी अनेकदा ऐपत नसताना त्यावर मोठा खर्च केला जातो. हुंडा ही तर कुप्रथाच. परंतु किती हुंडा दिला आणि घेतला हा सामाजिक प्रतिष्ठेचा मापदंड झाला असेल, तर या प्रथेला रोखणार कोण? ही प्रथा पूर्वीही जीवघेणी होती. आजही आहे. आज मात्र तिचे स्वरूप पालटले आहे. आता ती अविवाहित तरुणींचे, त्यांच्या वडिलांचे, भावांचेही बळी घेऊ लागली आहे. हुंडा देण्यासाठी वडिलांकडे पसे नाहीत म्हणून लातूरच्या शीतल वायाळ या शेतकरी कन्येने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही तर अगदी अलीकडची घटना.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा