भारतात ‘धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्र’ स्थापन करणे आणि भारतातील ‘दुष्टां’चा नाश करणे हे सनातन संस्थेचे ध्येय. मानसोपचारतज्ज्ञ जयंत बाळाजी आठवले यांनी १९९९ मध्ये या संस्थेची स्थापना केली. गोव्यातील रामनाथी आणि पनवेल येथे या कट्टरतावादी संस्थेचे आश्रम आहेत. ठाणे, पनवेलमधील बॉम्बस्फोटांत संस्थेच्या दोन साधकांना कारावासाची शिक्षा झाली होती. गोव्यातील नरकासुर दहन प्रथेला विरोध म्हणून संस्थेशी संबंधित असलेल्या काही जणांनी बॉम्बस्फोटाचा कट आखल्याचा आरोप होता. तो बॉम्ब स्कूटरवरून नेताना फुटला. त्यात मलगोंडा पाटील आणि योगेश नाईक हे साधक ठार झाले. या प्रकरणी सनातनच्या सहा साधकांना अटक करण्यात आली होती. पुढे न्यायालयात ते पुराव्याअभावी सुटले. मात्र या प्रकरणाशी संबंधित काही लोक अद्याप फरार आहेत. कॉ. गोिवद पानसरे यांच्या हत्याप्रकरणीही सनातनच्या समीर गायकवाडला अटक झाली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात नुकतीच संस्थेशी संबंधित असलेल्या एकाला अटक करण्यात आली. या संस्थेचे अनेक साधक महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात आहेत. संस्थेचे स्वत:चे वृत्तपत्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा