कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४० गावांवर हक्क सांगत असताना महाजन आयोगाच्या अहवालाचा आधार घेतला असला तरी कर्नाटकातील मराठी भाषिक गावांबाबत अवाक्षरही काढले नाही. मात्र, यामुळे एक बरे झाले, जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४० गावे महाराष्ट्रात आहेत आणि तीही सांगली जिल्ह्यात आहेत याची जाणीव राज्यकर्त्यांना झाली. गेल्या कित्येक निवडणुका पाण्याच्या प्रश्नावर लढविल्या गेल्या. पाणी काही आले नाही, दुष्काळाची साथ काही केल्या सुटता सुटत नाही हे खरे येथील जनतेचे दुखणे आहे. मात्र कर्नाटकने कुरापत काढताच पाणी प्रश्न आम्हीच सोडवू शकतो हे सांगण्यासाठी राजकीय नेत्यांचे तू की मी चालले आहे. मतांच्या गठ्ठय़ावर डोळा ठेवून चालू असलेले हे श्रेयवादाचे राजकारण पुन्हा विकासापासून वंचित असलेल्या या पूर्व भागातील जनतेच्या दुखण्यावर मीठ चोळण्याचाच प्रकार म्हटला पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा