कवलापूरची काळी माती आणि सवाळ पाणी हे गाजराला आवश्यक घटक नैसर्गिकरीत्या उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजर लागवड केली जात आहे. तीन महिन्यांचे पीक असले, तरी थंडी सुरू होताच, दिवाळीनंतर गाजर बाजारात विक्रीसाठी तयार होते. संक्रांतीला तर गाजराचे महत्त्व अधिक आहे. याचबरोबर रोजच्या आहारात कच्चे गाजर खाण्याची पद्धतही आहे. भरपूर पोषणमूल्य, मधुमेहींनाही त्रासदायक न ठरणारे कंदमूळ म्हणून गाजराचा उल्लेख आढळतो. यामुळे लहानापासून थोरापर्यंत आवडीचे कंदमूळ म्हणून गाजर आवडीने खाल्ले जाते. बहुसंख्य चित्रपटांत तर गाजर हलवा मायेने करून खाऊ घातला जात असल्याने याकडे ओढाही जास्त पाहण्यास मिळतो. गाजराचा उपयोग आहारात भाजी म्हणून किंवा कच्चे खाण्यासाठी केला जातो. जनावरांचे खाद्या म्हणूनही केला जातो. गाजरामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याचा आहारात नियमित उपयोग केल्यास डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहून दृष्टिदोष होत नाही. गाजराचा उपयोग सूप, सॅलड, लोणची, हलका, जॅम इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी करतात. गाजराच्या चकत्या करून सुकवून त्या साठविल्या जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा