कुटुंबातील चौदा जणांची हत्या करून स्वत:ला गळफास लावल्याच्या ठाण्यातील घटनेने देश हादरला.. एवढे क्रौर्य कसे निर्माण होऊ शकते या प्रश्नाने अनेकांना अस्वस्थ केले. अर्थात वैयक्तिक, सामाजिक जीवनात दिसत असलेली ही क्रौर्याची एकमेव घटना नाही. गेल्याच आठवडय़ात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने महिला वाहतूक पोलिसाला केलेली मारहाण असो नाहीतर हरयाणामध्ये जाट आरक्षणाच्या आंदोलनात झालेल्या सामूहिक हिंसाचाराच्या घटना असोत. या घटनांच्या निमित्ताने समाजामध्ये व वैयक्तिक जीवनात हिंसेचा होत असलेला अवलंब नक्कीच चिंता निर्माण करणारा आहे. इतर वेळीही बस-रेल्वे प्रवासात होणारी शिवीगाळ-भांडणे, कोणत्याही मतभेद-वादातून हाणामाऱ्यांपर्यंत जाणाऱ्या घटना, बलात्कार, खून, आत्महत्यांच्या घटना घडतात. या घटनांमधील तपशील जरी वेगळे असले तरी हिंस्रपणाचा भाव मात्र सारखाच आहे. स्वत:ला किंवा दुसऱ्याला इजा पोहोचवण्यासाठी केलेली कृती, अशी हिंसेची ढोबळ व्याख्या करता येईल. यात केवळ शारीरिकच नव्हे तर शिवीगाळ, धमकी देणे अशाही बाबींचा समावेश करता येईल. लोकांमध्ये निर्माण होत असलेले हे हिंसेचे आकर्षण, त्यांच्या अतिरेकी टोकाच्या भूमिका, सार्वजनिक व कौटुंबिक ठिकाणी केले जाणारे आक्रमक वर्तन याचा ऊहापोह मानसोपचारशास्त्राच्या मदतीने केला जात असतो. केवळ मनोविकार किंवा व्यक्तिमत्त्व दोष असणाऱ्यांकडूनच नव्हे तर सामान्य म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तींकडूनही अनपेक्षितपणे गंभीर हिंसक कृती केली जाते. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या हिंसक घटनांच्या पाश्र्वभूमीवर हिंस्र प्रवृत्ती कशी निर्माण होते, त्याची कारणे, व्यक्ती अशा कृती करण्यापर्यंत कशी पोहोचते आणि अशा वृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी करावे लागणारे उपाय यांवर मानसोपचारतज्ज्ञांकडून टाकलेला प्रकाश..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा