मृण्मयी पाथरे
मंदार गेल्या दोन वर्षांपासून मनालीला डेट करत होता. तो लहानपणापासूनच एकत्र कुटुंब पद्धतीत दोन-तीन बिऱ्हाडांसोबत राहत होता. आपण लग्नानंतर स्वतंत्र घराचं स्वप्न आपल्या जोडीदारासोबत साकार करू, असं त्याला खूप वाटायचं. मात्र त्याने ही गोष्ट घरातील वडीलधाऱ्या मंडळींच्या कानावर घालताच ‘मंदार लग्नापूर्वीच कसा बदलला आहे. जोडीदार भेटली, तर घरच्यांना विसरला आहे. आपण इतकी वर्ष जोडून ठेवलेलं घर भंग करायला निघाला आहे’, असे टोकाचे विचार त्याला ऐकून घ्यावे लागले. मोठी स्वप्नं पाहणं खरंच इतकं वाईट आहे का, असा प्रश्न त्यालाही पडला. राहत्या घरात प्रायव्हसी मिळणार नसली आणि तो खूश नसला तरी आजपर्यंत ज्यांनी आपल्याला मोठं केलं, त्या वडीलधाऱ्यांना दुखवायचं नाही म्हणून त्याने त्याच्या स्वप्नांना ‘होल्ड’वर ठेवलं. लग्नानंतर काही महिने मंदार आणि त्याच्या जोडीदाराने सगळय़ांशी नीट जुळवून घेतलं. पण कालांतराने आपण असेच इतरांच्या मतानुसार जगत राहिलो, तर आपल्याला आपलं वेगळं जग निर्माण करता येणार नाही या विचाराने त्या दोघांच्याही मनात कल्लोळ केला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा