११ मार्च २०२० , जागतिक आरोग्य संघटनेने कोविड -१९ ला अधिकृतपणे जागतिक महामारी म्हणून घोषित केले. भारतासह संपूर्ण जगात लॉकडाऊन लागून सगळ्यांना घरात कोंडून घ्यावं लागलं. लॉकडाऊनमुळे मिळलेल्या सक्तीच्या कैदेत बाहेरच्या जगाची क्षणाक्षणाची स्थिती जाणून घेण्याची तीव्र इच्छा वाढीस लागली. या काळात मोबाइल २४ तासांसाठी हातात आला. कोविडच्या भयातून नकारात्मक वातावरण बनत गेलं. याचे पडसाद तरुणाईच्या नेट सर्फिंगवरदेखील उमटले. सोशल मीडियावर, बातम्यांत सतत कोविडमुळे झालेले मृत्यू, हाताबाहेर चाललेली परिस्थिती, लोकांचे होणारे हाल यांचेच अपडेट पाहिले जाऊ लागले. टीव्हीवरील बातम्या आणि सोशल मीडियावरील कन्टेन्टमध्येदेखील सतत रुग्णांची वाढती संख्या, हॉस्पिटलमध्ये शिल्लक नसलेल्या जागा, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, रोज वाढणारी मृत्युसंख्या याच घडामोडी दाखवत होत्या. यातून सतत अशाच नकारात्मक बातम्या पाहण्याची इतकी सवय लागली की स्मशानात अंत्यसंस्कारासाठी रांग, जीवनावश्यक वस्तूंअभावी होणारे हाल अशा बातम्यादेखील चवीने पाहिल्या जाऊ लागल्या. आता संपूर्ण जग या महामारीतून सावरून पूर्ववत झालं आहे खरं, पण इंटरनेटवर नकारात्मक गोष्टी पाहण्याची अनेकांची सवय अजूनही तशीच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा