पावसाळ्यात हवामान सतत आणि झपाट्याने बदलत असते. त्याचा शरीरावर परिणाम होत असतो. याच काळात चातुर्मास असून उपवासाचेही दिवस असतात. तब्येतीच्याही अनेक तक्रारी उद्भवतात. या बदलत्या हवामानाशी आपल्या शरीराला जुळवून घेणे सोपे जावे यासाठी आहाराची आखणी करावी. पावसाळ्यात आहार कसा असावा? याविषयी मार्गदर्शन करताना मुंबईतील आहारतज्ज्ञ शैला जोशी म्हणाल्या, ‘पावसाळ्यात घरचे ताजे व नैसर्गिक अन्न खावे. आहारातील समतोल राखण्यासाठी न्याहरीला पोहे, उपमा, अप्पे, घावणे, अंडी यांसारखे पदार्थ खावेत. दोन वेळेच्या जेवणात पोळी, वरणभात, विविध भाज्या, डाळी किंवा उसळी, कोशिंबिरी असा चौरस आहार असावा. पोळीऐवजी नाचणी, ज्वारी, बाजरी या विविध पिठांच्या भाकऱ्या तसेच थालीपीठ, पराठे असेही पदार्थ खाता येतील. या पदार्थांतून कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्व ‘ब’ व इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची शारीरिक गरज पुरविली जाते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते’. पावसाळ्यात कुठल्याही प्रकारच्या ब्रेडवर बुरशी लवकर येऊ शकते, त्यामुळे ब्रेड शक्यतो टाळावा. ब्रेड खाल्लाच तर तो ताजा व तव्यावर गरम करून खावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा